28 July, 2012

प्रेम सुकुन गेलंय
बकुळफुला सारखं,
गंध मात्र दरवळतोय...


मैत्री निष्पर्ण झालीय
ग्रीष्माचा तडाखा सोसत,
वठलेलं खोड मात्र उभंच आहे...


वात्सल्य आटुन गेलंय
दुष्काळाची चाहुल घेत
निवडुंग मात्र बहरतोय ....


भावना जळुन गेल्यात
कापरासारख्या,
राख देखील उरली नाही...

नाती संपुन गेलीत,
आयुष्य संपत आलंय,
अस्तित्वाच्या पाऊलखुणा पुसल्या जातील
एका क्षणात!!

--
मृणाल भिडे
28 जुलै 2012




No comments:

Post a Comment