कविता मात्र माझ्या मनात रेंगाळत राहतात... खुप दिवस, महिने, वर्ष देखील... म्हणूनच मी कविता सहसा वाचायलाच जात नाही.
मोबाईल डिक्लटरींग करताना हा फोटो सापडला. आवडलेल्या कवितांचं फोटो मध्ये कोलाज करणं हा ही एक माझा आवडता प्रकार होता... आजही आहे.
हि कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा वाटलं हि कविता ब्रेकअप झाल्यानंतरची आहे 🙄 आज लक्षात येतं हि प्रत्येक लग्न झालेल्या, न झालेल्या प्रत्येकीची गोष्ट आहे. 🙂
"दिवसाच्या चोवीस मात्रा संसाराच्या दहा फुटी खोलीत चपखल बसवणारी विंदाच्या नजरेतली प्रसन्न स्त्री " (झपताल) आणि " प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरून, ओठांवरची मौनमुद्रा उकलून मोजकं बोलणारी शांताबाई यांच्या नजरेतली ती रुक्ष स्त्री" (मौनमुद्रा) हि दोन्ही तिचीच तर रुपं.... पण एका लेखकानं लिहिलेली कविता आणि लेखिकेनं केलेली कविता याच्यातला मुलभूत फरक तो हाच असेल का?